ये नंबर वन यारी है...


आयुष्याच्या प्रवासात मुसाफिरी करीत फिरलं की प्रत्येक वळणावर आपण अनेक मित्र कमावतो. खूप नवीन नाती बनतात, मग ती कितीही घट्ट का असेना त्यांना जुन्या मैत्रीची सर  येत नाही. जसा मुराब्बा मुरतो ना काळासोबत तसच या मैत्रीचही असत. प्रत्येकाच्या आयुष्यात असे एक-दोन मित्र असतात जे लहानपणी पासून सोबत असतात. या जुन्या मैत्रीच गणित पण खूप वेगळं असत. इथे एकापेक्षा शून्याला जास्त किंमत असते, कारण अपेक्षांचं ओझ इथे कधीच एकमेकांवर लादलं जात नाही. काही कारणामुळे आपल्यातले अंतर वाढते पण आपली मैत्री तशीच टिकलेली असते. वर्ष्यातून एकदा भेट होते काही मित्रांची पण त्या भेटीत तीच ताजगी असते. जेंव्हा पण बोलण होत लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळतो, कसे शाळेत धिंगाणा घालायचो, कसे  क्लास सुटल्यावर गल्लीतून पळत जाऊन आपल्या क्रश ला बघायला धावपळ करायचो आणि हो दोघांचीही क्रश एकच असते बर का! वर्ग वेगळा असला तरी मधल्यासुटीत त्याच्या वर्गात जाऊन कसे जेवायचो, सगळं सगळं आपण पुन्हा एकमेकांना सांगत बसतो. फ्लॅशबॅक म्हणतात ना तो हाच, मग आपल वय किती ही होऊ तो चालणारच. या मित्रांना आपण अजूनही लहानपणी ज्या नावानी बोलवायचो त्याच नावांनी आजपण बोलवतो जस की गोट्या, लल्या, बाळ्या वगैरे कारण खऱ्या नावात ती सर नाही येत, सर म्हणण्यापेक्षा ते लहानपण नाही येत त्यात, जे गरजेच असत. हे मित्र लांब असले तरी ते आपल्या हृदयाजवळच असतात कारण म्हणतात ना मैत्री स्पंदने जीवनाची. आणि हो, ही यारी अशीच चालणार प्रत्येकाची कारण “ये नंबर वन यारी है ।

Comments

Popular posts from this blog

LIFE MEANS WHAT....?

एक इंजिनीअर

THE HALF LOVE STORY 6